About Author

सोमवार, १४ फेब्रुवारी, २०२२

हिजाब घातलेली मुलगी एक दिवस भारताची पंतप्रधान होईल – असदुद्दीन ओवेसी

 

हा संपूर्ण आठवडा हिजाब प्रकरणामुळे चांगलाच चर्चेत राहिला. मुस्लीम मुलींना हिजाब घालून शाळे प्रवेश देण्यात यावा की येऊ नये, यावरून हा वाद सुरू होता. यावर कर्नाटक उच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. दरम्यान, याचसंदर्भात खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी रविवारी मोठं वक्तव्य केलंय. हिजाब घातलेली मुलगी एक दिवस भारताची पंतप्रधान होईल, असं ओवेसी म्हणाले आहेत.

ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लीमीनचे प्रमुख ओवेसी यांनी रविवारी एक व्हिडीओ ट्विट केला, ज्यामध्ये त्यांनी म्हटले आहे की “हिजाब परिधान केलेल्या महिला महाविद्यालयात जातील, जिल्हाधिकारी, दंडाधिकारी, डॉक्टर, व्यवसायिक महिला होतील. मी कदाचित हे पाहण्यासाठी जिवंत नसेन, परंतु माझे शब्द लिहून ठेवा की  एक दिवस हिजाब परिधान केलेली मुलगी या देशाची पंतप्रधान होईल.”ते पुढे म्हणाले, “जर आमच्या मुलींनी हिजाब घालायचे ठरवले आहे आणि त्यांच्या पालकांना त्यांना हिजाब घालायचे आहे, तर त्यांचे पालक त्यांना पाठिंबा देतील. त्यांना कोण रोखतंय ते आम्ही पाहू!”

हिजाब प्रकरण नेमकं काय?

कर्नाटकातील उडुपी जिल्ह्यातील कुंदापूर येथील सरकारी कनिष्ठ महाविद्यालयात हिजाब (हेडस्कार्फ)वरून गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू आहे. हिजाब घालून महाविद्यालयात प्रवेश करणाऱ्या मुस्लीम विद्यार्थिनींना सातत्याने महाविद्यालयात प्रवेश नाकारण्यात येत आहे. कर्नाटक राज्य सरकारने जारी केलेल्या ड्रेस कोडबाबतच्या नियमानुसार हिजाब परिधान करण्यास परवानगी दिली जाणार नाही, असा कडक आदेश महाविद्यालयीन अधिकाऱ्यांनी देऊनही काही मुस्लीम विद्यार्थिनी आपल्या पालकांसह महाविद्यालयात आल्या असता त्यांना महाविद्यालयीन परिसराच्या बाहेर उभे करण्यात आले. त्यामुळे मुलींसह त्यांच्या पालकांनीही गेटबाहेर निदर्शने केली. त्याचवेळी या मुलींचा निषेध करण्यासाठी काही हिंदू विद्यार्थी भगवे उपरणे घालून महाविद्यालयाच्या परिसरात फिरत होते. त्यामुळे हा विषय अधिकच चिघळला.

भारत सरकारकडून पुन्हा ५४ चिनी अ‍ॅप्सवर बंदी

 


केंद्र सरकारने ५४ हून अधिक चिनी अ‍ॅप्सवर बंदी घालण्याचे आदेश दिले आहेत. या  अॅप्सपासून भारतीयांच्या गोपनीयतेला आणि सुरक्षिततेला धोका आहे, असे हा निर्णय जारी करताना अधिकाऱ्यांनी सांगितले. बंदी घालण्यात आलेल्या यापैकी बरेच अॅप्स Tencent, Alibaba आणि गेमिंग फर्म NetEase सारख्या मोठ्या चिनी तंत्रज्ञान कंपन्यांचे आहेत आणि २०२० पासून भारतात बंदी घालण्यात आलेल्या अॅप्सचे नामांतर केलेले किंवा दुसऱ्या ब्रँडच्या नावाखाली नव्याने लाँच केलेले आहेत.

ईकोनॉमिक्स टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, हे अॅप्स चीनसारख्या परदेशातील सर्व्हरवर भारतीयांचा गोपनीय आणि संवेदनशील डेटा ट्रान्सफर करत असल्याच्या कारणावरून इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी मंत्रालयाने हे बंदी आदेश जारी केले आहेत. गुगलच्या प्ले स्टोअरसह टॉप अॅप स्टोअरनाही हे अॅप्लिकेशन ब्लॉक करण्याचे निर्देश दिले आहेत. एका अधिकाऱ्याने सांगितले की, “प्ले स्टोअरवर भारतात ५४ अॅप्स आधीच ब्लॉक करण्यात आले आहेत. या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी Meity ने माहिती तंत्रज्ञान कायदा २००० च्या कलम ६९ अ अंतर्गत आपल्या अधिकारांचा वापर केला आहे.

आतापर्यंत भारतात २५४ चिनी अॅप्सवर बंदी-

जून २०२० पासून सरकारने सुमारे २२४ चिनी अॅप्सवर बंदी घातली आहे.

पहिल्यांदा जेव्हा चिनी अॅप्सवर बंदी घातली तेव्हा ५९ अॅप्सचा समावेश होता. ज्यात TikTok, Shareit, WeChat, Helo, Likee, UC News, Bigo Live, UC Browser, ES File Explorer आणि Mi Community सारख्या लोकप्रिय ऍप्लिकेशन्सचा समावेश आहे. नंतर नोव्हेंबरमध्ये, स्नॅक व्हिडिओ, AliExpress आणि AliPay कॅशियरसह आणखी ४३ चीनी अॅप्सवर बंदी घालण्यात आली होती. सप्टेंबरमध्ये सरकारने आणखी ११८ अॅप्सवर बंदी घातली.

बंदी घालण्यात आलेल्या अॅप्सची यादी खालीलप्रमाणे…

1 Beauty Camera: Sweet Selfie HD
2 Beauty Camera – Selfie Camera
3 Equalizer – Bass Booster & Volume EQ & Virtualizer
4 Music Player- Music.Mp3 Player
5 Equalizer & Bass Booster – Music Volume EQ
6 Music Plus – MP3 Player
7 Equalizer Pro – Volume Booster & Bass Booster
8 Video Player Media All Format
9 Music Player – Equalizer & MP3
10 Volume Booster – Loud Speaker & Sound Booster
11 Music Player – MP3 Player
12 CamCard for SalesForce Ent
13 Isoland 2: Ashes of Time Lite
14 Rise of Kingdoms: Lost Crusade
IS/APUS Security HD (Pad Version)
16 Parallel Space Lite 32 Support
17 Viva Video Editor – Snack Video Maker with Music
18 Nice video baidu
19 Tencent Xriver
20 Onmyoji Chess
21 Onmyoji Arena
22 AppLock
23 Dual Space Lite – Multiple Accounts & Clone App
24 Dual Space Pro – Multiple Accounts & App Cloner
25 DualSpace Lite – 32Bit Support
26 Dual Space – 32Bit Support
27 Dual Space – 64Bit Support
28 Dual Space Pro – 32Bit Support
29 Conquer Online – MMORPG Game
30 Conquer Online Il
31 Live Weather & Radar – Alerts
32 Notes- Color Notepad, Notebook
33 MP3 Cutter – Ringtone Maker & Audio Cutter
34 Voice Recorder & Voice Changer
35 Barcode Scanner – QR Code Scan
36 Lica Cam – selfie camera app
37 EVE Echoes
38 Astracraft
39 UU Game Booster-network solution for high ping
40 Extraordinary Ones
41 Badlanders
42 Stick Fight: The Game Mobile
43 Twilight Pioneers
44 CuteU: Match With The World
45 Small World-Enjoy groupchat and video chat
46 CuteU Pro
47 FancvU – Video Chat & Meetup
48 Real: Go Live. Make Friends
49 MoonChat: Enjoy Video Chats
50 Real Lite -video to live!
51 Wink: Connect Now
52 FunChat Meet People Around You
53 FancyU pro – Instant Meetup through Video chat!
54 Garena Free Fire – Illuminate

या अॅप्सवर बंदी घालण्यात आली आहे.

हिजाब वादाच्या पार्श्वभूमीवर योगी आदित्यनाथांचा इशारा; म्हणाले, “गजवा-ए-हिन्दचं स्वप्न पाहणाऱ्यांनी…”



“राज्यातील सर्व कर्मचाऱ्यांनी भगवे कपडे घालावेत असं मी म्हणून शकतो का?, तर नाही असं मला म्हणता येणार नाही.”

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दुसऱ्या टप्प्यामध्ये आज राज्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या मतदानाआधी ट्विट करुन गजवा-ए-हिंदचं स्वप्न पाहणाऱ्यांचं स्वप्न कयामतच्या दिवसापर्यंत पूर्ण होणार नाही असं म्हटलंय. एएनआयला दिलेल्या मुलखातीमध्ये मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली नवीन भारत आकार घेत असल्याचं म्हटलं आहे. या नव्या भारतामध्ये सर्वांचा विकास होईल कोणासोबतही भेदभाव केला जाणार नाही असं योगी म्हणाले आहेत. नवीन भारत संविधानानुसार काम करेल शरीयतप्रमाणे नाही असंही योगी म्हणाले आहेत. हिजाबवरुन देशामध्ये सुरु असणाऱ्या वादाच्या पार्श्वभूमीवर योगींनी केलेल्या या वक्तव्यामधून त्यांनी सांकेतिक पद्धतीने विरोधकांना इशारा दिलाय. गजवा-ए-हिंदचं स्वप्न कयामतच्या दिवसापर्यंत पूर्ण होणार नाही, असंही योगी म्हणालेत.

कर्नाटकमधील हिजाब वादावर मुख्यमंत्री आदित्यनाथ यांनी देशातील कारभार हा संविधानानुसारच चालणार असं म्हटलंय. आपण आपले धार्मिक विचार देश आणि येथील संस्थांवर लादू शकत नाही, असंही योगींनी स्पष्ट केलंय. राज्यातील सर्व कर्मचाऱ्यांनी भगवे कपडे घालावेत असं मी म्हणून शकतो का?, तर नाही असं मला म्हणता येणार नाही. लष्करामध्ये कोणालाही कोणताही पोशाख घालण्याची परवानगी देता येईल का? तशाच पद्धतीने शाळांमध्ये ड्रेसकोड आवश्यक आहे, असं योगी म्हणालेत. भारत शरीयतनुसार चालणार नाही तर संविधानानुसार चालणार आहे हे तालिबानी विचारसणी असणाऱ्यांनी लक्षात ठेवावं असा इशारा योगींनी ट्विटरवरुन दिलाय. ‘गजवा-ए-हिन्द’ का स्वप्न पाहाणाऱ्यांनी असं म्हणत योगींनी हिजाब वादामध्ये विद्यार्थ्यांचं समर्थन करणाऱ्यांना टोला लगावलाय.

शुक्रवार, २१ जानेवारी, २०२२

बीडमध्ये १० रुपये भाड्याने मिळतं हेल्मेट

करोनाचा संसर्ग वाढत असताना हेल्मेट विक्रेत्यांकडून ही सेवा पुरवली जात असल्याने संसर्ग वाढण्याची भीती व्यक्त केली जातेय. बीडमध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी लागू केलेल्या नियमांचं उल्लंघन करण्यासाठी एक विचित्र जुगाड करण्यात आल्याचं प्रकरण समोर आलं आहे. बीडमध्ये पेट्रोल भरण्यासाठी पेट्रोल पंपावर हेल्मेट सक्तीचे करण्यात आलंय. मात्र बीडमध्ये याच शासन निर्णयास धाब्यावर बसवून, सर्रास पेट्रोल पंपाबाहेर दहा रुपये भाडेतत्त्वावर हेल्मेट दिले जात आहे.
हेल्मेट न वापरता पेट्रोल भरायला जाणाऱ्यांना पेट्रोल पंपाबाहेरच हेल्मेट दहा रुपये भाड्याने दिलं जात असल्याचा व्हिडीओ सध्या वायरल होतोय. हेल्मेट सक्तीचे आदेश बीडच्या सर्वच पेट्रोल पंपावर झळकत असले तरी जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या या आदेशाची पायमल्ली होताना दिसत आहे.
दुसरीकडे करोनाचा संसर्ग वाढत असताना हेल्मेट विक्रेत्यांकडून जुगाड करणाऱ्यांना मदत करण्यासाठी सुरु केलेला हा स्वस्त धंदा आरोग्याच्या महागात पडण्याची चिन्हं आहे. तेच तेच वापरलेले हेल्मेट ग्राहकांना देत असल्यानं करोनाचा संसर्ग वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. तर या हेल्मेट सक्तीमुळे पेट्रोल पंप चालक आणि ग्राहकांमध्ये आता वाद होऊ लागले आहेत.
जिल्हाधिकार्‍यांनी या निर्णयाचा फेरविचार करावा, अशी मागणी देखील आता सर्वसामान्य बीडकरांसह पेट्रोल पंप चालक करत आहेत.

कारण माझे ब्रेस्ट मोठे नाहीत

 


नीना गुप्ता यांचा हा जुना व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.बॉलिवूड अभिनेत्री नीना गुप्ता या मोठ्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. नीना या त्यांच्या खासगी आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत असतात. ते बऱ्याच काळापासून अभिनय क्षेत्रात सक्रिय आहेत. त्यांचे बरेच फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात. नुकताच, नीना यांचा एक जुना व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.
Solapur Today
नीना यांनी ‘द कपिल शर्मा शो’मध्ये हजेरी लावली होती. यावेळी कपिल नीना यांना बोलतो की आम्ही असं ऐकलं होतं की “तुम्हाला ‘बेवॉच’ चित्रपटात पामेला एंडरसनची भूमिका साकारायची होती.” यावर त्या कपिलला उत्तर देत म्हणाल्या, “अरे माझे इतके मोठे बूब्स नाही मग कसं करणार.” नीना यांनी दिलेलं उत्तर ऐकूण तिथे उपस्थित असलेले सगळे प्रेक्षक हसू लागतात. त्यांचा हा जुना व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

गुरुवार, २० जानेवारी, २०२२

मधुमेहावर ‘या’ चार औषधी वनस्पती ठरतात रामबाण उपाय; रक्तातील साखर ठेवतात नियंत्रणात

 

अलीकडे तर अगदी तरुण वयोगटालाही या आजाराने ग्रासले असून यासोबतच हृदयविकार, मूत्रपिंडाचे आजार, रक्तदाब या आजारांनाही घेऊन येत आहे..

मधुमेह नावातच गोडवा असणारा परंतु आयुष्यातील गोडी कमी करणारा आजार. दुर्दैव असे की हा आजार जगभरात अक्राळ-विक्राळपणे पाय पसरत आहे आणि भारतात रुग्णसंख्या वेगाने वाढत आहे. अलीकडे तर अगदी तरुण वयोगटालाही या आजाराने ग्रासले असून यासोबतच हृदयविकार, मूत्रपिंडाचे आजार, रक्तदाब या आजारांनाही घेऊन येत आहे. ग्लुकोज वाढते ते रक्तात आणि रक्त सर्व शरीरात फिरते. त्यामुळे साहजिकच शरीरातील अनेक इंद्रियांनाही याचा उपद्रव होतो.

ज्या लोकांच्या शरीरातील साखरेचे प्रमाण अधिक आहे त्यांना अनेक औषधे घ्यावी लागतात. आपल्या जीवनशैलीत बदल करून आपण आपल्या शरीरातील साखरेचे प्रमाण आटोक्यातही आणू शकतो. डॉक्टरने सांगितलेली औषधे आणि आपल्या जीवनशैलीतील बदलांसोबतच काही मसाले आणि औषधी वनस्पतींच्या सेवनाने आपण शरीरातील साखर नियंत्रणात आणू शकतो. जाणून घेऊया या औषधी वनस्पती आणि मसाल्यांबाबत.

मुंबईत सोमवारपासून शाळा सुरु- आदित्य ठाकरे

 सोमवारपासून राज्यातील सर्व शाळा सुरु करण्यास परवानगी देण्यात आल्यानंतर आता मुंबईतील शाळा देखील २४ जानेवारीपासून सुरू होणार असल्याची माहिती पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी दिली आहे. कोविड नियमांचे पालन करत मुंबईतील शाळा उघडणार असल्याचे आदित्य ठाकरे म्हणाले. शाळा सुरू करण्याबाबत राज्य सरकारच्या निर्णयानंतर मुंबई महापालिकेने स्थानिक स्तरावर पूर्व प्राथमिक ते बारावीपर्यंतच्या शाळा २४ जानेवारीपासून सुरू करण्यासंदर्भातला निर्णय जाहीर केला आहे. आदित्य ठाकरे यांनी ट्विट करत ही माहिती दिली आहे.

१५ ते १८ वयोगटातील मुलांचे आता शाळांमध्येही लसीकरण; मंत्रीमंडळाच्या बैठकीनंतर निर्णय

 


मुलांचं शाळेत लसीकरण करताना संपूर्ण काळजी घेतली जाणार असल्याचे राजेश टोपे म्हणाले.

सोमवारपासून राज्यातील सर्व शाळा सुरु करण्यास परवानगी देण्यात आल्यानंतर आता शाळांमध्येही लहान मुलांची लसीकरण मोहिम राबण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. राज्याच्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याचे राजेश टोपे यांनी सांगितले. तसेच मुलांच्या लसीकरणाबद्दल संभ्रम बाळगण्याचं कारण नाही असेही राजेश टोपे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

“मंत्रिमंडळाच्या बैठकीत करोना स्थितीबद्दलचं सादरीकरण करण्यात आले. त्यानंतर त्यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. लसीकरणावर जोर दिला गेला पाहिजे, यावर बैठकीत भर देण्यात आला आहे. आजही लसीचा पहिला डोज आणि दुसरा डोज यामध्ये राज्यातील काही जिल्हे मागे पडले आहेत. त्या जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांसह आयुक्तांनी विशेष लक्ष द्यावं, अशी चर्चा बैठकीत झाली,” असं राजेश टोपे यांनी सांगितलं.

“२४ जानेवारीपासून राज्यातील सर्व शाळा पुन्हा एकदा सुरू केल्या जाणार आहेत. जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी, पालकमंत्री, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि शिक्षणाधिकारी यांच्या सल्ल्याने कोणत्या तालुक्यातील आणि कोणत्या शाळा सुरू करायच्या हा निर्णय त्यांनी द्यावा. मात्र, बऱ्यापैकी शाळा सुरू कराव्यात असा निर्णय बैठकीत घेण्यात आला आहे,” अशी माहिती टोपे यांनी दिली.

“१५ ते १८ वयोगट म्हणजे नववी, दहावी आणि अकरावीच्या वर्गातील मुलांचं शाळेत लसीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुलांचं शाळेत लसीकरण करताना संपूर्ण काळजी घेतली जावी, अशी चर्चाही बैठकीत झाली,” असंही राजेश टोपे यांनी सांगितलं.

“१५ ते १८ वयोगटातील ५० टक्के मुलांचं लसीकरण झालेलं आहे. त्याला निश्चित आता गती मिळेल. शाळा सुरू व्हाव्यात. लहान मुलांच्या शिक्षणावर तसेच मनोविकासावर कुठल्याही प्रकारचा विपरित परिणाम होणार नाही, या पार्श्वभूमीवर शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याला टास्क फोर्सनेही संमती दिली आहे,” असे टोपे म्हणाले.

“लसीकरणाबद्दल पालकांमध्ये संभ्रम असण्याचं कोणतंही कारण नाही. जगामध्ये सगळीकडे लहान मुलांचंही लसीकरण सुरू झालेलं आहे. आपल्याकडे सध्या १५ ते १८ वयोगटातील मुलाचंच लसीकरण केलं जात आहे. त्यामुळे लसीकरणाबद्दल संभ्रम बाळगण्याचं कारण नाही,” असं आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पालकांना केलं.

करोना काळात देशात सर्वाधिक विकली गेलेली ‘डोलो ६५०’ नक्की कसं काम करते?

 


करोनाच्या २० महिन्यांत ५६७ कोटी रुपयांच्या ३५० कोटी डोलो ६५० गोळ्यांची विक्री झाली आहे

सध्या भारतीय डोलो ६५० करोना महामारीदरम्यान देशातील सर्वाधिक प्रसिद्ध असे औषध म्हणून उदयास आले आहे. सध्या हे देशातील सर्वाधिक विकले जाणारे औषध आहे. करोनापूर्वीही हे औषध वापरले जात होते. पण करोनाच्या तिसऱ्या लाटेत डोलो ६५० वरचढ आहे. वेदना आणि तापावरील या औषधाने विक्रीच्या बाबतीत क्रोसिनला मागे टाकले आहे. मार्च २०२० ते डिसेंबर २०२१ पर्यंत, करोना महामारीच्या २० महिन्यांत ५६७ कोटी रुपयांच्या ३५० कोटी डोलो ६५० गोळ्यांची विक्री झाली आहे. करोनाच्या तिसऱ्या लाटेत डोलोने विक्रीचे रेकॉर्ड तोडले आहेत.

डोलो २०२१ मध्ये ३०७ कोटी रुपयांच्या विक्रीसह भारतातील दुसरे सर्वाधिक विकले जाणारे ताप आणि वेदनानाशक औषध बनले आहे. दुसरीकडे, GSK ची Kalpol ३१० कोटी रुपयांच्या विक्रीसह अव्वल स्थानावर आहे. क्रोसिन सहाव्या क्रमांकावर पोहोचली आहे. डोलो ६५० बनवणारी कंपनी मायक्रो लॅब्स लिमिटेड, बंगळुरू येथील आहे. दुसरीकडे, Kalpol आणि क्रोसिनची निर्मिती ब्रिटनस्थित बहुराष्ट्रीय कंपनी जीएसके फार्मास्युटिकल्सने केली आहे. डिसेंबर २०२१ मध्ये, डोलो ६५० ने २८.९ कोटी रुपयांच्या गोळ्यांची विक्री केली आहे, जी डिसेंबर २०२०च्या तुलनेत ६१.४५ टक्के जास्त आहे. डोलोची वाढती लोकप्रियता दाखवण्यासाठी हे आकडे पुरेसे आहेत.